प्रतिनिधी / मडगाव
आर्लेम जंक्शनजवळ चुकीच्या जागी उभारण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थेच्या चेंबरमुळे या परिसरात पूर सदृश्य स्थिती होण्याचा संभव निर्माण झाला असून या प्रश्नावर त्वरित उपाय योजना न आखल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्यात येणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
मडगाव -बोरी राज्य महामार्ग आर्लेम भागातून जातो. आर्लेम भागातून जाणारा हा भाग सखल भागातून जात असल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळय़ात या रस्त्यावर पाणी साचते. लोकवस्ती असलेल्या आर्लेम भागाच्या पाठीमागे मोठमोठे डोंगर असून या डोंगराळ भागातून पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी सखाल भाग असलेल्या राज्य महामार्गावर येते आणि दुचाकी सोडा चार चाकी कारही चालवणे कठीण होऊन बसते. साचलेल्या पाण्याची पातळी कमी होण्यासठी बराच कालावधी लागतो ही वस्तुस्थिती आहे.
या पार्श्वभूमवर आर्लेम जंक्शनजवळील नाल्यावरच सांडपाण्याच्या सिमेंटचे कायमस्वरुपी चेंबर उभारण्यात आलेल्यामुळे या परिसरात चिंतेचे एक सावट पसरलले असून यंदाच्या पावसाळय़ातील संभाव्य परिस्थितीची कल्पना करुनच आर्लेम परिसरातील स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राय गावच्या सरपंच मिंगेलिना डिसौझा यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांबरोबर या सिमेंटच्या चेंबरची पाहणी केली. या संबंधी बोलनाता सरपंच डिसौझा म्हणल्या की स्थानिक गामस्थ आणि शेतकऱयांनी या प्रश्नावर लक्ष वेधले आणि त्यावर यंदाच्या पावसाळय़ापूर्वी उपाय योजनेसाठी पाऊले उचलण्याची विनंती केली.
त्यानंतर सरकारी खात्यांना यासंबंध कळविल्यानंतर खात्याचे अधिकारी गुरुवारी येऊन पाहणी केली आणि हा प्रश्न प्राधान्यक्रमाने होती त्यांनी आश्वासन दिल्याचे सांगितले.