राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी केली दाखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील आलीमवाडी येथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी 27 लाख, 9 किमी पाईपलाईनसाठी 3 कोटी, असे 4 कोटी 27 लाख पालिका खर्च करणार आहे. तो नागरिकांच्या टॅक्समधून आणि नाहक खर्च आहे. चुकीच्या गोष्टी घडत असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून थांबवणे माझे कर्तव्य आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आलीमवाडीतील जागा खरेदीवरून सत्ताधाऱयांच्या भूमिकेवरून नगर परिषदेत जोरदार रणकंदन उठवण्यात आले आहे. 3.88 गुंठे जागेच्या दराबाबत भाजपा, व राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेतला आहे. स्पष्टीकरण देताना रेडेरेकनरप्रमाणे प्रतिगुंठा 6.24 लाख मूल्यांकन होते. जास्तीत-जास्त या जागेचे मूल्यांकन 22 ते 23 लाख रुपयेच आजच्या घडीला होत असल्याचे सांगितले. मात्र सेनेच्या सत्ताधाऱयांनी नको त्या दायित्वावर या जागेची रक्कम 1.27 कोटी इतकी केली आहे. त्यामुळे आमचा कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे. भाजपाकडूनही पूर्ण ताकदीनिशी विरोध केला आहे. सत्ताधाऱयांनी केलेले काम चुकीचे असल्याचे दाखवून देण्यात आले आहे.
नाहक नगर परिषदेला 1.23 कोटींचा भूर्दंड पडला आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांची ही बाब पटलेली नाही. या प्रकरणात अनाठायी खर्च होत असल्याने राष्ट्रवादीनेही तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी 308 खाली जिल्हाधिकाऱयांकडे अपिल करण्यात आलेले असून त्यावर सुनावणी सुरू झाली आहे. आता तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी दाखल केलेली जनहित याचिका लवकरच ती बोर्डावर येणार असल्याची माहिती दिली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटय़े उपस्थित होते. परिषदेकडे जागांचा पर्याय होता. तरी त्याचा विचार न करता एवढी महागडी आणि परिषदेला आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात टाकणारा हा व्यवहार आहे. घाईघाईत झालेला हा व्यवहार संशयास्पद आहे. म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याचे भोसले यांनी सांगितले.