सातारा शेती उत्पन्न बाजार समितीची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
सध्या व्यापाऱयांतर्फे शेतकऱयांकडून खरेदी करण्यात येणाऱया आल्यामध्ये नवे आले व जुने आले असा फरक करून त्याची खरेदी करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. एकंदरीत प्रकरण पाहता, आले खरेदी करणाऱया शेतकऱयांची व्यापाऱयांकडून पिळवणूक करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आल्यामध्ये जुने/नवे असा कोणताच फरक नसतो, त्यामुळे शेतकऱयांची पिळवणूक थांबवावी, अशा प्रकारचे परिपत्रक नुकतेच सातारा शेती उत्पन्न बाजार समिती, साताराच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
आले हा शेतीमाल खरेदी करताना माल जुना किंवा नवा असे वर्गीकरण न करता त्या मालाची प्रत पाहुन त्याचा योग्य दर करून खरेदी करावा. कारण यापूर्वी जुना किंवा नवा असा कोणताही नियम प्रचलित नव्हता व नाही त्यामुळे माल खरेदीबाबत योग्य ती काळजी घ्यावी. याबाबत बाजार समितीकडे अशी, कोणतीही तक्रार आल्यास आपली अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
या सर्व प्रकारामुळे शेतकरी वर्गांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या आले बाजारपेठेत 200 ते 300 रूपये 10 किलो दराने विक्री करण्यात येत आहे. यामुळे दर पाहता शेतकऱयांचा उत्पादनाचा खर्च ही नघत नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत भारतीय किसान संघाने सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज ही केला होता. त्यानुसार असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधीत व्यापाराचे लायसन्स (अनुज्ञप्ती) रद्द करण्याचा आदेश नुकताच परिपत्रकाद्वारे दिला आहे.
शेतकऱयांना मिळणार दिलासा
सातारा जिल्हय़ातील पुर्वेकडील पुसेगाव, खातगुन, नेर, कोरेगाव, नागठाणे, पाडळी या भागात आले उत्पादक शेतकऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच येथे व्यापारी वर्ग ही तितक्याच प्रमाणात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशा प्रकारे नवे/ जुने आले असे फरक करण्याच्या घडना घडत असल्याचे उघडकीस येत असल्याने संबंधित व्यापाऱयांचे लायसन्स रद्द करण्याचा आदेश जारी केल्याने जिल्हय़ातील सर्वसामान्य शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.