साहित्य : 1 किलो आवळा, सव्वा किलो पिठीसाखर, 20 ग्रॅम तुरटी, 20 ग्रॅम मीठ, मोठी वेलची, बदाम इच्छेनुसार
कृती : प्रथम आवळा धुवून तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवावेत. दुसरे दिवशी आवळे पाण्यातून काढून त्याला टोकदार सुरीच्या सहाय्याने टोचे द्यावेत. त्यानंतर आवळे गरम पाण्यात शिजायला ठेवावेत. नंतर आवळे गरम पाण्यातून काढून चाळणीत सुकायला ठेवावेत. त्यानंतर एका भांडय़ात पिठीसाखर पसरवून घ्यावी. त्यावर आवळे ठेवावेत. उरलेली पिठीसाखर वरुन आवळय़ावर घालावी. आता हे भांडं घट्ट झाकून लावून ठेवावे. आता चौथे दिवशी झाकण काढून आवळय़ांना वेगळं करावे. आणि त्याचा उरलेला रस शिजवून घ्यावा. त्यामध्ये आता वेलची आणि बदाम घालावेत. आता हा पाक गार झाल्यानंतर तो एका चिनी मातीच्या बरणीत ओतावा. त्यात आवळे घालावेत. मुरल्यानंतर आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार मुरांबाचा उपयोग करावा.
टीप : हा मुरांबा पचन ठीक करण्यासाठी आणि उष्णतेला शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.