म्हैसूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी त्यांना आव्हानं मिळाल्यास मी आनंदी होतो आणि अधिक सामर्थ्य मिळते असे वक्तव्य म्हैसूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत त्यांनी केले. आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समुदायांकडून होणार्या निषेधांविषयी विचारले असता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जेव्हा आव्हाने असतील तेव्हा मला आनंद होतो आणि मला अधिक सामर्थ्य मिळते. प्रत्येक समाजाला न्याय देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अर्थसंकल्पाची तयारी सुरू असून संबंधित अधिकारी त्याची तयारी करत आहेत. प्रभारी मंत्री आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर आम्ही म्हैसूरला सर्व शक्य ते लाभ देऊ. म्हैसूर विमानतळाच्या विस्तारासाठी अधिक लक्ष देण्याची माझी योजना आहे, असेही ते पुढे म्हणाले.
राज्य सरकारकडे कोणताही निधी नाही अशा टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोणतीही विकास कामे रखडली जात नाहीत आणि सत्ताधारी पक्षावर आरोप करणे सामान्य आहे. अर्थसंकल्पातून विरोधी पक्षांना उत्तरे मिळतील, असे येडीयुरप्पा म्हणाले.