कोविड योद्धय़ा आशांची सरकार दाद घेईना
प्रतिनिधी/ सातारा
आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य न केल्याने संपूर्ण राज्यात बेमुदत संप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला साताऱयातील शहर पोलीस प्रमुख अण्णासाहेब मांजरे यांनी परवानगी नाकारली. तरीही प्रशासनाने मागण्या मान्य कराव्यात म्हणून जिह्यातील अडीच हजार आशा आंदोलनासाठी जिल्हा परिषद येथे जमल्या होत्या. त्यांच्यावर पोलिसांनी दबाव आणून आशाचे आंदोलन हानून पाडले. कोरोना काळात जीवावर उधार होत तुटपुंज्या पगारात काम करणाऱया आशांची सरकारदरबारी वारंवार निराशा होत असून त्यांची दाद कोणीही घेत नाहीत.
गेले दीड वर्ष प्रंटलाईन वर्कर्स व कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी जीव धोक्यात घालुन समाजाची सेवा आशा स्वयंसेविका करत आहेत. त्यांना तुटपुंज्या मानधनावर सरकार राबवून घेत आहे. मास्क, सॅनिटायझर, कामाचा मोबदला वेळेवर दिला जात नाही. किमान वेतन 8 हजार व इतर मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आशा स्वयंसेविका व संघटनांनी आंदोलन केले. मात्र साताऱयातील आंदोलनावर पोलिसांचा दबाव निर्माण झाला होता. सातारा जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सीटु) संघटनेच्या वतीने शहर पोलीस प्रमुखांना परवानगी मागितली होती. त्यांनी परवानगी नाकारली. तरीही सरकारने मागण्या मान्य कराव्यात म्हणून सोमवारी जिह्यातील अडीच हजार आशा जिल्हा परिषद कार्यालय येथे जमल्या होत्या. या आशाना पोलिसांनी परत पाठवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आंदोलन करण्याची ठोस भूमिका आशांनी घेतली होती. यामुळे सर्व आशांना पोलीसांनी जिल्हा परिषद मैदान येथे जमा केले. त्यांची नावे लिहुन घेतली. व त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
राजकीय पक्षाला गर्दी चालते मग आंदोलनासाठी का नको
सोशल डिस्टनचा फज्जा उडु नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. मात्र राजकीय पक्षाच्या वतीने विविध मुद्दावर आंदोलन गेल्या महिन्याभरापासून जिह्यासह शहरात होत आहे. यांना पोलीस प्रशासन कोणाच्या वरदहस्ताने परवानगी देत आहे. त्या आंदोलनावेळी नियम मोडले जात नाहीत का ? आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनावर पोलिसांचा दबाब का अशी विचारणा सातारा जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी केली.