मुख्य कार्यकारी अधिकाऱयांचे ग्रामपंचायतींना आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून काम केलेल्या आशा कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये प्रोत्साहन रुपये द्यावेत असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सर्व ग्रामपंचायतेंना दिले आहेत. जिल्हय़ातील तीन हजार आशांना याचा लाभ होणार आहे.
जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाय योजना केल्या. यामध्ये सर्वाधिक जोखीम आशा कर्मचाऱ्यांवर सोपवली होती. त्यांना सुरक्षीततेची कोणतीही साधणे नसताना त्यांनी जीव धोक्यता घालून सव्हेक्षण केले आहे. त्या कामाचे बक्षीस म्हणून प्रोत्साहन भत्ता मिळावा अशी मागणी संघटनेच्या अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी केली होती. याची दखल घेवून सीईओ मित्तल यांनी वरील आदेश दिले आहेत. 14 व्या वित्त आयोगातून हा खर्च करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.