प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचा करणार निषेध
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने राज्यात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिह्यातील आशा कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिह्यातील सर्व आशा कर्मचारी सोमवारी 21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा सरनोबत व सचिव उज्वला पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकामध्ये म्हटले आहे, आशा व गटप्रवर्तक दुपारी बारा वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनवर जमणार आहेत. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. गवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना अंगणवाडी कर्मचारी संघटना सक्रिय पाठिंबा देणार आहेत. कोरोना महामारीत आशा कर्मचाऱयांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत काम केले आहे परंतु शासनाकडून मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना कामासाठी प्रति दिवस 3 रुपये मिळतात, गटप्रवर्तकाना प्रति दिवस 15 रुपये मिळतात.
त्यामुळे आमच्या जीवाची किंमत एवढीच आहे का असा सवाल आशा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतात जाणारी शेतमजूर महिला दोनशे, तीनशे रुपये रोजगार घेते, धुणीभांडी करणारी घरेलू कामगार महिला एका घरच्या कामासाठी महिन्याला तीन हजार रुपये घेते. आणि आरोग्य खात्यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात काम करून शासन आशा कर्मचाऱ्यांचे प्रचंड मानसिक व आर्थिक शोषण करत आहे.
याबाबत जिह्यातील सर्व आमदार, खासदार व अरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रलंबीत मागण्याबाबत निवेदने दिली. प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पोहोचवली आहेत. पण सरकार कडे पैसा नाही असे मंत्र्यांकडून सांगितले जाते. तर दुसरीकडे कंत्राटी पध्दतीने आरोग्य कर्मच्यार्यांना कोवीडच्या काळात 0 हजार हजार रूपये पगार दिला. आणि कामे आशा कर्मचाऱयांकडून करून घेतली. याबाबत सरकार व संघटनांमधील चर्चा निषफळ ठरली. त्यांचा निषेध म्हणून सर्व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे पत्रकात नमूद आहे.