प्रतिनिधी / कोल्हापूर
आशा कर्मचाऱ्यांना दिलेल्या सेवा समाप्तीच्या नोटिसा तात्काळ मागे घ्या. असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.
मुश्रीफ यांच्या या आदेशाने तीन हजार अशा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शासकीय विश्रामगृहावर उज्वला पाटील भरमा कांबळे चंद्रकांत यादव यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन अशा कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
विविध मागण्यांसाठी अशा कर्मचारी आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी नोटीस बजावल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांच्या दारावती नोटीस चिकटवल्याने अशा कर्मचारी संतापल्या होत्या.