पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या सोहळयास पंढरपूरात गर्दी होउ नये. यासाठी पोलिसाकडून 29 जून ते 02 जुलै पर्यत पंढरीत संचारबंदी करण्यात यावी. असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पंढरीत वारकरी येउ नयेत. यासाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त देखिल उभा करण्यात आला असल्यांची माहीती अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा 1 जुलै रोजी होणार आहे. या अनुषंगाने यंदा केवळ मानांच्या संताच्या पालख्या पंढरपूरात येणार आहे. अशावेळी पंढरपूरात गर्दी होउ नये. आरोग्यसंपन्न वारी व्हावी. कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव तसेच संसर्ग होणार नाही. यांची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. यांचाच एक भाग म्हणून पंढरपूरात कडक संचारबंदी करण्यात यावी. यादृष्टीने आता पोलिसांनी पाउले उचलण्यास सुरूवात केली आहे.
साधारणपणे दशमी दिवशी अर्थात 30 जून रोजी पालख्या पंढरपूरात येतील. तत्पूर्वी एक दिवस म्हणजेच 29 जून पासून पंढरपूरात संचारबंदी सुरू करण्याची तयारी प्रशासनाची आहे. तसेच 02 जुलै रोजी संताच्या पालख्या पंढरपूरचा निरोप घेणार आहेत. त्यादृष्टीने गुरूवारी मध्यरात्रीपर्यत संचारबंदी असावी. असा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे.
तसेच आषाढी यात्रेमध्ये पंढरपूरात विनापरवाना कुठलाही भाविक येउ नये. यासाठी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त आहे. याकरिंता 1500 पोलिस कर्मचारी शुक्रवारपासून बंदोबस्ताकरिंता लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंढरीत जर एखादा भाविक आला. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हयाच्या बाहेर सोडण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण पोलिस बंदोबस्त करीत असताना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या आरोग्याची काळजी घेण्यांचे आव्हान देखिल यंदा पोलिसांसमोर आहे.