केंद्र अन् राज्य सरकारचा पुढाकार ः केएलओच्या म्होरक्याचे आत्मसमर्पण
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन या उग्रवादी संघटनेचा स्वयंघोषित कमांडर इन चीफ जीवन सिंघा कोच आणि काही अन्य पदाधिकाऱयांसोबत केंद्र सरकारने शांतता चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र आणि आसाम सरकार केएलओसोबत चर्चा करणार असून याकरता तारखांना अंतिम स्वरुप दिले जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली आहे.
जीवन सिंह कोच हे मुख्य प्रवाहात परतले आहेत ही मोठी घटना आहे. त्यांना काही काळापर्यंत आराम करू द्या, मग सरकारसोबत ते चर्चा करतील असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यंनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. जीवन सिंह कोच आणि आणि अन्य 9 पदाधिकारी तसेच उग्रवादी संघटनेच्या सदस्यांनी नागालँडच्या मोन जिल्हय़ातील लोंगवा क्षेत्रात सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण पेले होते.
स्वतंत्र राज्याची मागणी
केएलओ ही उग्रवादी संघटना कोच राजवंशी समुदायासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत आहे. हा समुदाय उत्तर पश्चिम बंगालच्या काही हिस्स्यांमध्ये फैलावला आहे. तसेच आसाम कामतापूरसाठी एका वेगळय़ा राज्याची मागणी करत आहे. संबंधित भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू ठेवत राजकीय संवादाच्या माध्यमातून सर्व मुद्दे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या आणि मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या केएलओ नेतृत्वाच्या इच्छेचे स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी डिसेंबरमध्ये म्हटले होते.