ऑनलाईन टीम / माजुली :
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरामुळे माजुली बेटाचा अधिकाधिक भाग पाण्याखाली जात आहे, त्यामुळे भविष्यात या बेटावर स्थलांतर करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही, परिणामी हे बेट नष्ट होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
तज्ञांच्या मतानुसार, माजुली बेटावर अंदाजे 1 लाख 70 हजार लोक राहतात. दरवर्षी मान्सूनमध्ये पर्जन्यमान अधिक असल्याने या बेटाचा अधिकाधिक भाग पाण्याखाली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना स्थलांतरीत व्हावे लागते. पुरामुळे या बेटाचा अधिकाधिक भाग दीर्घकाळ पाण्याखाली जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तर बेटावरील जमीन नापीक होत आहे. पाऊस आल्यावर बेटावर राहणारे मिशिंग आदिवासी लोक आपल्या जनावरांना घेऊन उंचावरील भागात स्थलांतरीत होतात. मात्र, येत्या काळात स्थलांतरीत होण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक राहणार नाही. मागील 12 वर्षात या बेटावरुन 10 हजार कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
सध्या हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर असून, ते 2040 पर्यंत पूर्णपणे नष्ट होईल, असेही तज्ञांनी म्हटले आहे.