नागरिकत्व सुधारणा कायद्याची पार्श्वभूमी : सभेला हजारोंचा समुदाय : मोदींचा दौरा लवकरच
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
नागरिकत्व सुधारणा कायदा संमत झाल्यावर तसेच आसाममध्ये एनआरसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुवाहाटी येथे शनिवारी सभा घेतली आहे. बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या या सभेत भाजपचे 50 हजारांहून अधिक कार्यकर्ते सामील झाले. आसाममध्ये झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या सभेला शक्तिप्रदर्शनाच्या स्वरुपात पाहिले जात आहे.
सभेत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि आसामचे मंत्री सामील झाले आहेत. पण भाजप वगळता उर्वरित सर्व पक्ष कौटुंबिक मालमत्ता ठरले आहेत. भाजप अद्याप तत्वांनुसार कार्यरत आहे. विचारांनी भारतमातेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम भाजप करत असे नड्डा म्हणाले. नड्डा यांनी भाषणात सीएए तसेच अन्य देशांमध्ये पीडित अल्पसंख्याकांच्या स्थितीचा उल्लेख केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 रोजी आसामच्या दौऱयावर जाणार आहेत. सीएएच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान अशांत राहिलेल्या आसामच्या काही संघटनांनी या दौऱयाला विरोध करण्याची घोषणा केली आहे. ऑल आसाम स्टुडंट युनियनने मोदींच्या दौऱयाला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. खेलो इंडिया क्रीडास्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.