मार्च ते मे दरम्यान महसूलात 2100 कोटींचे नुकसान ?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगासोबत देशातील महत्वाचे व्यवसाय कोरोनाच्या विळख्यात होरपळून निघाले आहेत तर निवडक व्यवसाय काही प्रमाणात सुरु झाले आहेत. देशातील आसाम आणि बंगालमधील चहा उद्योगांवरही मार्च ते मे या कालावधीत कोरोनाची छाया राहिल्याचा अंदाज भारतीय चहा संघाकडून(आयटीए) व्यक्त करण्यात आला आहे.
सदरच्या कालावधीत आसाम-बंगालमधील चहा उद्योगाची बंद काळातील कमाई 2100 कोटी रुपयांच्या नुकसानीत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच या दोन्ही राज्यातील चहाचे उत्पादन जवळपास 14 कोटी किलोग्रॅमने घटण्याचे संकेतही यावेळी व्यक्त केले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत आसाम आणि बंगालमधील मार्च एप्रिलच्या दरम्यान 65 टक्के आणि फक्त मे मध्ये 50 टक्क्मयांनी उत्पादनात घट झाली आहे. नेहमीपेक्षा खूप कमी कर्मचारी आता चहाच्या बागेत काम करत आहेत. यावर भारतीय चहा संघाने वाणिज्य मंत्रालयाकडे दोन्ही राज्य सरकारच्या चहा उत्पादकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विनंती केली आहे.
चहाची मागणी कायम
निर्यात पाहता इराण, रशिया, संयुक्त अरब अमीरात आणि युरोप यासारख्या देशांकडून तोडलेल्या चहाची मागणी केली जात आहे. याचाच अर्थ चहाची मागणी कायम राहिली आहे.
चहा उत्पादनाचा वेग
मागील वर्षात करण्यात आलेल्या लिलावाच्या किमतीच्या आधारे चहा उद्योगाला होणाऱया नुकसानीचा अंदाज नोंदवला आहे. तसेच याच दरम्यान कोविड 19च्या प्रभावामुळे चहा उद्योगावर दबाव आला असल्याचे भारतीय चहा संघाच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे. मागील पाच वर्षात चहा उद्योगाच्या उत्पादनाचा वेग वाढला होता त्याप्रमाणात त्यांची किंमत वधारली नसल्याचेही म्हटले आहे.