ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसाममधील दिमा हसाओ जिह्यातून एक भयानक घटना घडली आहे. दियुंगबराजवळ संशयित अतिरेक्यांनी सात ट्रक पेटवून दिले. यामध्ये पाच ट्रक जळून खाक झाले असून यामध्ये 5 ट्रक चालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिमा हसाओमध्ये उरमंगसो-लंका रोडवर दिसमाओ गावाजवळ अतिरेक्मयांनी 7 ट्रकना आग लावली. यापूर्वी अतिरेक्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी आग लावली. दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी 5 मृतदेह ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यामागे डिमासा नेशनल लिबरेशन आर्मी (DNLA ) ही अतिरेकी संघटना असल्याचा पोलिसांना संशय आहे. आता आसाम रायफल्सच्या मदतीने क्षेत्रात व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.