ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात 12,000 डुक्करांना ठार मारण्याचे आदेश आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिले आहेत.
एप्रिल महिन्यात आसाममार्गे आफ्रिकन स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला. 25 एप्रिलनंतर 3 मे पर्यंत आसाममधील 306 गावांमधील 2500 हून अधिक डुक्करांचा यामुळे मृत्यू झाला होता. आता आसाममधील डुक्करांच्या मृत्यूची संख्या 18 हजारांवर पोहचली आहे.
डुक्कर पालन करणाऱ्या मालकांचे म्हणणे आहे की,सरकार डुक्करांच्या मृत्यूचा आकडा चुकीचा सांगत आहे. या रोगामुळे 18 हजारपेक्षा जास्त डुकरांचा मृत्यू झाला आहे. या रोगासाठी लस नाही आणि त्याच्या मृत्यूचे प्रमाण 90 ते 100 टक्के आहे. सरकारच्या वतीने डुक्कर पालन करणाऱ्या मालकांनाकोणतीही मदत देण्यात आलेली नाही. किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याची तक्रार शेतमालकांनी केली आहे.