यावर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर चिपळूणात पुराचे मोठे संकट उभे राहिले होत़े पुरामुळे हजारो लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होत़े समाजातून मदतीचा प्रवाह तयार झाला असला तरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चिपळूणवासियांना मोठय़ा कष्टात घालवावा लागला होत़ा यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी मुलभूत प्रयत्न व्हावे, अशी मागणी सर्व पातळ्यांवर होत होत़ी
शासकीय पातळीवर तत्परतेने काही निर्णय होतील, अशी अपेक्षा चिपळूणकरांनी बाळगली नव्हत़ी धरणे आंदोलन करुन सरकारला जाग आणावी लागेल़ अशी खात्री सामान्य लोकांना वाटत होत़ी त्यातूनच चिपळूणात आंदोलन उभे राहिल़े वाशिष्टी आणि शिवनदी या दोन मुख्य नद्यांच्या पात्रातील गाळ काढला जावा, अशी मुख्य मागणी धरणे आंदोलनाला बसलेल्या लोकांनी केल़ी
राज्य सरकारने धरणातील गाळ उपश्यासाठी काही निधी मंजूर केल्याचे जाहीर केल़े त्याचबरोबर पाणी प्रश्नाशी संबंधित असलेल्या आणि संवेदनशील असलेल्या नाम फाउंडेशनने चिपळूणातील काही भागातील गाळ काढण्याचे मान्य केल़े चिपळूणच्या लोकांनी या संस्थेला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवल़े शासकीय चौकटीत गाळ काढणे कदाचित अवघड ठरु शकत़े परंतु सामाजिक काम करणाऱया संस्थेने पुढाकार घेतल्यास नियमांचा जाच होणार नाह़ी, अशी अपेक्षा व्यक्त होत होत़ी
चिपळूणातील शिवनदीतील गाळ उपसा करण्याचे काम नाम फाउंडेशनने सुरू केल़े अवघ्या महिनाभरातच साडेतीन कि. मी.चे नदीपात्र गाळमुक्त झाले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तब्बल अठरा तास गाळाचा उपसा केला जात असून आतापर्यंत एक लाख घनमीटर इतका गाळ काढला गेला आहे.
वाशिष्ठी, शिवनदी पात्रामध्ये प्रचंड गाळ साठल्याने तिची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यावर लगेचच या नदीचे पाणी चिपळूणात शिरायला सुरुवात होते. शहरातील वाढती अतिक्रमणे व नदीतील अतिरिक्त गाळ यामुळे नद्यांची वहन क्षमता बाधित झाली आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडून वाशिष्ठी नदीत डिसेंबरमध्ये, तर नाम फाऊंडेशनकडून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात शिवनदीतील गाळ उपसाला सुरूवात झाली. ज्येष्ठ अभिनेते आणि नामचे सर्वेसर्वा नाना पाटेकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला होत़ा अवघ्या महिनाभरातच साडेसात कि. मी. लांबीच्या या नदीत आतापर्यंत साडेतीन कि. मी.पर्यंत गाळ उपसा केला गेला आहे. शिवनदीत 5 पोकलेनसह 20 टिपर, डंपर यांच्या सहाय्याने सकाळी 6 वाजल्यापासून गाळ काढण्याला सुरूवात केली जात आहे. अठरा तास काम केले जाते.
त्याचवेळी चिपळूणातील वाशिष्टी नदिच्या पात्रात असलेला गाळ काढण्याचे काम सरकारी जलसंपदा विभागाकडून सुरू आह़े हे काम नियमांच्या चौकटीत असल्याने त्याला काहीसा विलंब होत आह़े सरकार म्हणजे मोठी शक्ती एखाद्या संस्था संघटनेच्या किंवा शहरातील नागरिकांच्या क्षमतेच्या कितीतरी पट आर्थिक व कायदेशीर अधिकार शासनस्तरावर प्राप्त होतात़ या अधिकारांचा वापर करून अधिक वेगाने जनहिताची कामे केली पाहिजेत़, अशी अपेक्षा व्यक्त होत़े तथापि इतर ठिकाणांप्रमाणे चिपळूणात देखील शासकीय कामांनी अपेक्षित गती घेतलेली नाह़ी
एका बाजूला जनरेटा हवा म्हणून लोकांनी गाळ मुक्तीसाठी आंदोलन केल़े या आंदोलनाला सर्व पक्षिय पाठिंबा मिळाल़ा सरकार पातळीला निर्णय करून घेण्यासाठी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेतल़ा हे करताना काही कुरघोडय़ा देखील झाल्या पण चिपळूण विषयीची बांधिलकी निभावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी जरूर सांगितल़े सरकारी काम अधिक गती घेऊन मार्गी लागेल़, अशी अपेक्षा लोकांनी मनात ठेवली होत़ी
शासकीय पातळीवर कामासाठी विविध टप्पे ठरवून देण्यात आले आहेत़ कामाची मागणी, त्याला सक्षम प्राधिकाऱयाकडून तत्वतः मंजुरी, अंदाजपत्रक प्रशासकीय, आर्थिक, तांत्रिक मंजुरी यानंतर निविदा प्रक्रिया आणि सर्वात शेवटी कामाचा निपटारा असे सरकारी कार्यपद्धतीत सांगितले आह़े खरेतर काम उत्तम व्हावे म्हणून ही कार्यपद्धती तयार करण्यात आली आह़े अनेकवेळा कार्यपद्धती यशस्वीपणे पार पाडल्याचे दिसत़े तथापि लोकांना उपयोगी ठरणारे काम योग्य प्रकारे पूर्ण झाले असे म्हणता येत नाह़ी शासनाकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत़
चिपळूणात नाम फाउंडेशनने शिवनदीच्या गाळाची समस्या निपटून काढण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा स्थानिक रहिवाशांचा पाठिंबा मिळाला आणि काम चांगल्यापैकी मार्गी लागले याचे सर्व श्रेय आस्थेने काम करणाऱया लोकांना देणे आवश्यक आह़े यात नाम फाउंढडेशनच्या पदाधिकाऱयांपासून अंमलबजावणी करणाऱया सामान्य कामगारांकडून सर्वांनी त्यांच्या त्यांच्या कमाल क्षमता वापरून ठरवलेले उद्दीष्ट पार पाडण्याची जिद्द धरली आणि ठराविक काळात पूर्ण केल़ी
चिपळूणात महापुरासारखे संकट आल़े अशीच संकटे खेड, संगमेश्वर, राजापूर येथेही येत असतात़ या गावातल्या लोकांसाठी नाम फाऊंडेशनने एक आदर्श उभा करून ठेवला आह़े एखादी संस्था शासकीय कामापेक्षा अधिक परिणामकारक काम करून दाखवू शकत़े या कामामुळे लोकांची सोय होते आणि समाधान झाल्याचा प्रतिसाद मिळत़ो जनहित हा मुख्य मुद्दा असेल तर कार्यवाही कशी करावी हे आपल्या कामातून ‘नाम’ने स्पष्ट केल़े चिपळूण वगळता अन्य शहरांमध्ये गाळ मुक्तीसाठी विविध स्वयंसेवी संघटना पुढे येऊ शकतात़ या संघटनांच्या मदतीने गाळमुक्ती होऊ शकत़े थोडय़ा कालावधीसाठी का होईना नदीची उच्चतम पातळी मर्यादित राहू शकत़े
बलाढय़ व्यवस्था जे करू शकत नाही ते आस्था असलेली संस्था करू शकत़े असा संदेश चिपळूणातील गाळमुक्तीच्या प्रयत्नाने दिला आह़े हीच बाब केवळ महापूर आणि गाळमुक्तीपुरती मर्यादीत नसून प्रत्येक बाबीत सरकारवर अवलंबून राहणाऱया लोकांकरिता मार्गदर्शक राहणारी आह़े ग्रामीण विकास प्रकल्प असो किंवा शहरातील गरजूंना मदत पुरवण्याचे काम या क्षेत्रामध्ये विविध संस्था संघटनांनी बजावलेली कामगिरी निश्चितच लक्षणीय ठरली आह़े नामच्या चिपळूणातील प्रयोगामुळे अशा विचारांना बळकटी निश्चितपणे मिळेल़
सुकांत चक्रदेव