वृत्तसंस्था/ मेलबोर्न
येथे सुरू असलेल्या टी-20 महिलांच्या तिरंगी मालिकेतील शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा 4 गडय़ांनी पराभव केला. या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 6 बाद 123 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 18.5 षटकात 6 बाद 124 धावा जमवित विजय नोंदविला.
भारताच्या डावात सलामीच्या स्मृती मानधनाने 40 चेंडूत 45 धावा जमविल्या. मानधनाने 1 षटकार आणि 7 चौकार ठोकले. रॉड्रिग्जने 23 तर कर्णधार हरमनप्रित कौरने 14, वेदा कृष्णमूर्तीने 2 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे अनया श्रृबसोलने 31 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 18.5 षटकात 6 बाद 124 धावा जमवित हा सामना 7 चेंडू बाकी ठेवून जिंकला. इंग्लंड संघातील स्किव्हेरने 38 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 50 धावा झळकविल्या. भारतीय संघातर्पे राजेश्वरी गायकवाडने 23 धावात 3 गडी बाद केले. राधा यादवने 2 बळी मिळविले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा भारताने पराभव केला होता. पण त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रलियाकडून हार पत्करावी लागली. शुक्रवारच्या सामन्यात श्रबसोलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाबरोबर शनिवारी होत आहे.
संक्षिप्त धावफलक- भारत 20 षटकात 6 बाद 123 (मंदाना 45 रॉड्रिग्ज 23 श्रृबसोल 3-31), इंग्लंड 18.5 षटकात 6 बाद 124 (स्किव्हेर 50, गायकवाड 3-23).