व्हनाळी / सागर लोहार
इंधनाचे दर भडकल्याने शेतक-यांचे तोंडचे पाणी पळाले असून मशागतीसह कृषीमालाची वाहतुकही महाग झाली आहे. त्यामुळे ही इंधन दरवाढ शेतक-यांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. सध्या दररोजच होत असलेल्या पेट्रोल,डिझेलच्या किमती वाढत जावून आतापर्यंत प्रति लिटर मागे सुमारे 20 रूपयांनी दरवाढ झाल्याने याचा परिणाम शेती व्यवसायावरही स्पषट दिसू लागला आहे. अस्मानी- संकटे व वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे आगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतक-यांना पेट्रोल – डिझेल दरवाढीचा फास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात पिकणारा भाजीपाला,फुले हे मार्केटमध्ये विक्रीसाठी नेताना इंधन दरवाडीमुळे वाहतुकीचा अधिकभार शेतक-यांना सोसावा लागत आहे.
आज मितीला बैलांपेक्षा यांत्रिक मशागतीलाच प्राधान्य आहे. इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढलाच परंतू शेतक-याला शेतीसाठी जागणारे सर्व साहित्य, वाहतुक व्यवस्थेमुळे म्हागलेच आहे. औषधांच्या किमतीतर गगनाला भिडत आहेत. दुस-या बाजुला या सर्वाचा परिणाम उत्पादन खर्च वाढीवर होतो. उत्पन्नामध्ये मात्र ह्या पटीत वाढ झालेली नसून उत्पादीत केलेल्या शेतमालाचे भावदेखील जैसेथे आहेत. यामुळे आधुनिक शेतीकडे नोकरी नाही म्हणून वाढणारा सुशिक्षीत तरूणांचा ओढा देखील कमी होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुचे दरही वाढल्याने सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,व गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. सध्या वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे शेती मशागतीच्या खर्चात चांगलीच वाढ झाली असून ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करणे आता शेतक-यांला आवाक्याबाहेर होत आहे. कारण उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतक-यांची चिंता वाढत आहे.
जानेवारी 2017 मध्ये पेट्रोलचा भाव 71 रूपये व डिझेलचा भाव 60 रूपये प्रतिलिटर होता तर 31 जानेवारी 2021 रोजी पेट्रोल प्रतिलिटर 93.25 रूपये तर डिझेलचे दर 80 रूपयापर्यंत वाढले आहेत. मागील पाच वर्षाच्या कालावधीत पेट्रोल ल डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर सुमारे 20 रूपये दरवाढ अर्थात सुमारे सव्वापटीने इंधन भडकले.मात्र, दरदिवशी अत्यंत कमी प्रमाणात 25 पैसे ते 1 रूपयापर्यंत वाढ होत असल्याने ती ग्राहकांच्या लक्षात येत नाही. दुसरीकडे दुचाकी व चारचारी वाहनांची संख्या वाढत असताना पेट्रोल,डिझेलच्या किमतीही आकाशाला भिडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तरीही दरवाढीच्या या मुद्यावर आद्याप कोणत्याही विरोधी पत्र किंवा संघटनेने आंदोलनाचा शंखनाद केला नसल्याने ,शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत.
*आंदनी आठणी खर्चा रूपया…*
गेल्या दोन दकांपासून शेती करण्याच्या पध्दतीत आमूलाग्र बदल घडून आला.आठ दिवसाची कामे ट्रॅक्टरद्वारे दोन दिवात व्हायला लागली. त्यामुळे शेतक-यांचा वेळ वाचून मशागतीच्या कामांचा वेग वाढला त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होत होती. परंतु, डिझेलच्या दरवाढीमुळे मशागत करणे परवडणारे नसून उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढत आहेत.
“व्हॅलेटंईनच्या पार्श्वभूमिवर गुलाबाची शेती बहरत आहे. पंरतू इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच घटकांवर होवून दळणवळण महागले आहे याचा परिणाम ओषधे व खतांच्या दरवाढीवर झाला आहे त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सर्वच शेती परवडण्याच्या पलीकडे चालली आहे. त्यामुळे सरकारने इंधन दरवाढ कमी करून शेतक-यांना दिलासा द्यावा.” – प्रकाश कारंडे ः गुलाब उत्पादक शेतकरी,गोंरबे.