चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट दीर्घकाळापासून रखडला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये भन्साळी यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात प्रारंभी सलमान खान आणि आलिया भट्ट यांची जोडी दिसून येणार होती. पण काही कारणामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. तसेच सलमानने हा चित्रपट सोडून दिला होता.
पण भन्साळी पुन्हा एकदा हा प्रकल्प सुरू करत आहेत. भन्साळी यंदा एका नव्या जोडीसह चित्रपट सुरू करू इच्छित आहेत.
चित्रपटात आता अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऋतिक रोशन हे मुख्य भूमिकेत असू शकतात.
भन्साळी यांनी यासंबंधी ऋतिकसोबत चर्चा केली आहे. ऋतिक या चित्रपटावरून उत्सुक असल्याचे समजते. या चित्रपटातून पहिल्यांदाच ऋतिक आणि आलिया भट्ट यांची जोडी झळकणार आहे.