प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील गणेश नगर भागातील समाधान सायझिंग च्या बग्यास आणि लाकडाला आग लागली. इचलकरंजी नगरपालिकेच्या व पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आली. त्यामुळे भीषण प्रकार टाळला. ही घटना आज, रविवार सकाळच्या सुमारास घडली.
येथील गणेश नगर सहाव्या गल्लीत शिवाजी धोंडपुडे यांचे समाधान सायझिंग आहे. यासाठी साठी लागणारे लाकूड बगॅस आणि पाला रचून ठेवण्यात आला होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास याठिकाणी अचानक आग लागली आणि बघता बघता ही आग पसरू पसरू लागली. या बाबतची माहिती तात्काळ इचलकरंजी नगरपालिकेच्या व पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलास देण्यात आली. अग्निशामक दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर लागलेल्या आगीने पाला व बगॅस धुमसत असल्याने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने हा साठा बाजूला करण्यात आला. त्यामध्ये सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान या साठय़ा लगतच सायझिंग उद्योग आहे आग तातडीने आटोक्यात आल्यामुळे सायझिंग चे नुकसान टळले.