दोन दिवसात सुमारे 400 फलक जप्त `तरुण भारत’च्या वृत्ताची गंभीर दखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिका निवडणुक पार्श्वभूमीवर इच्छुकांनी चौकाचौकात उभारलेल्या डिजिटल फलकांवर महापालिकेने हातोडा घातला आहे. दोन दिवस सुरु असलेल्या या कारवाईमध्ये सुमारे सहाशे डिजिटल फलक अतिक्रमण विभागाने जप्त केले आहेत. तरुण भारत'मध्ये
शहरात तब्बल दोन हजारहून अधिक पोस्टर्स’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिकेने शहरात विनापरवाना उभारलेल्या डिजिटल फलकांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. यामुळे डिजिटल फलकांआड गेलेले शहरातील प्रमुख मार्ग व चौक करावाईनंतर मोकाळा श्वास घेत आहेत.
आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीला कोणत्या प्रभागातून सामोरे जावे लागणार याचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी स्वतःचे डिजिटल फलक उभारुन निवडणुकीचे मार्केटींग सुरु केले. निवडणुकीच्या आखाड्यात इच्छूकांची भाऊ गर्दी झाल्याने प्रभागातील चौकाचौकात इच्छुकांचे डिजिटल फलक उभा राहिले. एका प्रभागात किमान 8 ते 10 हून अधिक इच्छुक असल्याने संपूर्ण प्रभाग डिजिटल फलकांनी व्यापला. यामुळे शहराची विद्रुपीकरण झाले.
विभागीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी विनापरवाना डिजिटल फलक जप्त करण्याची मोहीम हाती घेतली. मंगळवारी शहरातील चारही विभागीय कार्यालयात कारवाई करत 300 हून अधिक बोर्ड जप्त करण्यात आले. तर बुधवारी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, जुना वाशी नाका, राजकपूर पुतळा, सुर्वेनगर, दत्तोबा शिंदे नगर, बापूरामनगर, कळंबा मध्यवर्ती कारागृह, हॉकी स्टेडियम, महालक्ष्मीनगर, जवाहरनगर आदी परिसरातील डिजिटल फलक हटविण्यात आले.