खानापूर : रविवारी सकाळपासून वादळी वाऱयासह सुरू असलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्मयातील इटगी येथे राहत्या घराची भिंत कोसळून दोन ठार तर दोन जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आजी व 3 वर्षांचा नातू यांचा जागीच मृत्यू झाला. दोडव्वा रुद्राप्पा पट्टेद (वय 55) व त्यांचा नातू अभिषेक सुरेश पट्टेद (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. तर या घटनेत त्यांचा मुलगा सुरेश व सून मंजुळा हे गंभीर जखमी झाले आहेत.
पट्टेद कुटुंबीय आपल्या जुन्या घरात बऱयाच वर्षांपासून राहत होते. घराची भिंत कमकुवत झाली होती. नेहमीप्रमाणे सकाळी उठून ते सर्वजण आपल्या घरात बसले होते. अचानकपणे सुसाट सुटलेल्या वाऱयामुळे घराची भिंत कोसळली. या खाली सापडून आजी व त्यांचा नातू हे जागीच ठार झाले. तर मुलगा व सून यांना गंभीर दुखापत झाली आहे.