साऱया देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. उत्तरप्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्यही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाल्याने मोठय़ा प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडत आहेत. रोगाचा प्रसार आणखी होऊ नये म्हणून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नातेवाईकांना न सोपविता सरळ स्मशानभूमीत नेले जातात. तथापि, स्मशानभूमीतही त्यांना अग्नी देणारे कोणीही मिळत नाही. मृतदेहाच्या जवळ जाण्यास नातेवाईकही घाबरतात. अशावेळी या मृतदेहांना अग्नी देणे आणि नंतर दोन-तीन दिवसांनी अस्थिविसर्जन करणे ही इतरांनी टाळलेली कामे करण्यास संघ स्वयंसेवक मोठय़ा संख्येने पुढे आले आहेत.
उत्तरप्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सर्व जिल्हय़ातील स्वयंसेवकांना हे महत्त्वाचे कार्य पार पाडण्यासाठी उद्युक्त केले आहे. उत्तरप्रदेशातील 20 जिल्हय़ांमध्ये 6 हजार स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्मयात घालून हे काम हाती घेतले आहे. रुग्णालयातून गंगाघाटावर किंवा स्मशानभूमीत मृतदेह आल्यानंतर चिता रचून या मृतदेहांना मंत्राग्नी देण्याचे कार्य संघ स्वयंसेवक करीत आहेत. या अग्निसंस्कारांसाठी लागणारी सामग्री ते स्वतः घेऊन येतात. धर्मनियमांनुसार रितसर क्रियाकर्म करून मृतदेहांना अग्नी दिला जातो. इतकेच नव्हे तर दोन किंवा तीन दिवसांनी अस्थिविसर्जनही त्यांच्याकडून केले जाते. शक्मय तितक्मया प्रमाणात रुग्णसेवा करणे, रुग्णांना अन्न व औषधे पुरविणे इत्यादी कामे करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. तथापि, मृतदेहावर अग्निसंस्करण करण्याचे काम मात्र प्रामुख्याने संघ स्वयंसेवकच करताना दिसतात. हे काम करत असताना स्वयंसेवक स्वतःची काळजीही शक्मय तितकी घेतात. पीपीई किट परिधान करून हे कार्य केले जाते. अनेक रुग्णालये आता या कामासाठी त्यांच्यावर विसंबून रहात आहेत.