ऑनलाईन टीम / मुंबई
सोनम कपूर सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय असते. सर्व घडामोडींवर नेहमी ती आपली रोखठोक मते मांडत असते .यापूर्वी तिनं अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केलेली आहे आणि अशाच एका पार्श्वभूमीवर ती सध्या चर्चेत आहे.
“शांत राहाणं हे काही वेळेस भ्याडपणाचं लक्षण असतं.” असं म्हणत अभिनेत्री सोनम कपूरने देशातील सध्याच्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे. ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’ वरून सध्या देशात सर्वत्र गोंधळ माजला आहे. दिल्लीत या कायद्याविरोधात हिंसक आंदोलन देखील केले गेले. या हिंसक आंदोलनात लोकांना प्राण ही गमवावे लागलेत .या पार्श्वभूमीवर सोनम कपूरच्या या वक्तव्याचा संबंध थेट दिल्ली हिंसाचाराशी जोडला जात आहे.
सोनम कपूरनं दोन ट्विट केली आहेत. यात पहिलं “शांत राहाणं प्रत्येक वेळेस योग्य नसतं, काही वेळेस ते भ्याडपणाचं लक्षण देखील ठरतं.” असे म्हणत शांत राहणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये तिने, “इतिहासाच्या योग्य बाजूस उभे राहा.अन्यथा आयुष्यभर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.” असं ही म्हंटलय.