खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयातील इदलहोंड येथे एका शेतकऱयाच्या परसातील गवतगंजीला रात्री नऊच्या सुमारास आग लावण्याचा प्रकार रविवारी घडला. त्यामुळे सदर शेतकऱयाचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असून गावातीलच काही संशयित व्यक्तींवर सदर शेतकऱयाने खानापूर पोलिसात लेखी तक्रार दाखल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गावापासून काही अंतरावर येथील शेतकरी प्रकाश दत्तू जाधव यांचे परसू आहे. या परसूमध्ये त्यांनी गवत आणून ठेवले होते. रविवारी रात्री 9 च्या सुमारास गावातील काही संशयितांनी या गवतगंजीला जाणीवपूर्वक आग लावण्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत गावातील जनसेवा ग्राम विकास आघाडीच्या पॅनेलला मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे पराभूत गटातील काही लोकांनी माझ्यावर नाहक आरोप करून आमच्या गवतगंजीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला असून पोलिसात तक्रार केली आहे. गवतगंजीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
गावातील रहदारीच्या वाटा बंद करण्याचे प्रकार
नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा ग्राम विकास आघाडीच्या पॅनेलला मतदारांनी कौल दिला आहे. आघाडीचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे या आघाडीच्या विरोधात पराभूत झालेल्यांनी गाव परिसरात, शेतवडीत जाणाऱया रहदारीच्या वाटा जेसीबी लावून बंद केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वीट व्यवसायासह पाणीपुरवठय़ाच्या योजना काहींच्या खासगी मालकी जमिनीतून जातात. शिवाय हरिजन कुटुंबासाठी असलेल्या स्मशानभूमीसाठी रस्ता काहींच्या जमिनीतून जातो. असे असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातून खासगी जमिनीतून जाणाऱया सर्व वाटा जेसीबीद्वारे बंद करून अडचण केली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱयांना नाहक त्रास होत आहे. अनेकांचा वीट व्यवसाय बंद पडला आहे. यासाठी संबंधितांना समज देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खानापूर तहसीलदार तसेच पोलीस उपनिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य व जनविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.