मुंबई
जनरल इन्शुरन्सच्या क्षेत्रात कार्य करणाऱया इफको टोकीयोने कोरोनाच्या काळात सुमारे 400 जणांना नोकरीची संधी देऊ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च, एप्रिल व मे या काळात देशभरात कंपन्यांचे काम, कारखाने व व्यवसाय सारे काही थांबलेले होते. अशा काळात काहींच्या नोकऱया गेल्या तर काहींचे पगार कापले गेले. पण इफको टोकीयोने मात्र 400 जणांना कंपनीत भरती करून घेतले असल्याचे समजते. वर्षाच्या सुरूवातीलाच भरतीची योजना आखून त्याप्रमाणे अर्ज मागवून व्हीडीयो कॉलवरून सर्व प्रक्रिया कंपनीने राबवली आहे. कंपनीला आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असल्याने त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ घेतले गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.