गुरुवारपासून सांस्कृतिक कार्यक्रम रविवार 19 रोजी भजनी सप्ताहाची सांगता
प्रतिनिधी /पणजी
इब्रामपूर येथील श्री सातेरी देवी व पंचायतन देवतांचा वार्षीक अखंड भजनी सप्ताह रविवार 12 सप्टेंबर पासून सुरु झाला आहे. रोज सात दिवस म्हणजे 19 सप्टेंबर पर्यंत सातेरी देवीच्या मंदीरात नामाचा गजर सुरु राहिल. 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर असे तीन दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 19 सप्टेंबर रोजी दुपारी अखंड भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे.
गुरुवारी दि. 16 सप्टेंबर रोजी त्वष्टा ब्राम्हण कासार समाजातर्फे पहिला पार होणार आहे. चव्हाटा येथे भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर चव्हाठा ते सातेरी मंदीरापर्यंत चित्ररथ मिरवणुक होणार आहे. मिरवणूकी दरम्यान गोव्यातील नामवंत दिडी पथकाचा दिंडी कार्यक्रम होणार आहे. 17 सप्टेंबर रोजी रात्रो 9.30 वा. विठोबा रखुमाई मंडळातर्फे दुसरा पार होणार आहे. त्यात सम्राज्ञी शेलार आईर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. गोव्यातील नामवंत हार्मोनिअम वादक राया कोरगावकर त्यांना हार्मोनिअमवर तर तुकाराम गोवेकर तबल्यावर साथ करतील. श्रीराज शेलार कार्यक्रमाचे निवेदन करतील. 18 सप्टेंबर रोजी पांडुरंग प्रसादीक मंडळातर्फे तिसरा पार होणार आहे. त्यात माऊली क्रिएशन प्रस्तूत संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. स्नेहा सुतार व शेखर पणशीकर गायन सादर करणार असून दिगंबर गाड, राजेश रेडकर, महेंद्र मांजरेकर व अत्माराम रेडकर साथसंगंत करीतल. निखीता शिरोडकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार.
19 सप्टेंबर रोजी सकाळपासून सातेरी देवीच्या मंदीरात भजनाचा कार्यक्रम नंतर श्रींची पालखीतून मिरवणूक होणार आहे. दुपारी दहीकाला झाल्यानंतर महा आरती होणार असून तिर्थप्रसादाने अखंडभजनी सप्ताहाती सांगता होणार आहे.s
खूप वर्षापूर्वी गावातील पूर्वज पंढरपूर येथे गेले होते. गावात भजनी सप्ताह करण्याच्या उद्दशाने त्यांनी येताना विठ्ठलाच्या नामाचा पोंवा आणला होता. पंढरपूरातून पोंवा घेऊन आलेले लोक चतुर्थीच्या दिवशीच गावात पोचले हाते. त्यामुळे विठ्ठलाच्या नामाचा पोंवा चव्हाठा येथे ठेवण्यात आला. दिड दिवस गणेशचतुर्थी साजरी करून चतुर्थीच्या तिसऱया दिवसापसून अखंड भजनी सप्ताह साजरा करण्यात आला होता. तिच परंपरा पुढे सुरू राहिली. एकंदरीत गावात चतुर्थीचे दहाही दिवस हे उत्सवाचे होत असल्याने गावात एक वेगळेच वातावरण निर्माण होत असते. असेही त्यांनी सांगितले. सातेरी देवीच्या मंदीरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून ती एक परंपराच आहे. काळानुरूप बदल व्हावा या उद्देशाने मंदीराची पुनरबांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. अधिकाधिक काम पूर्णही झाले आहे. मंदीराच्या पुनरबांधणीचे काम म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच असून भविकांनी त्यासाठी सढळ मदत करावी असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.