गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी
तीन दिवसापूर्वी पूर्वी उजळाईवाडी येथे आपल्यावर गुन्हा नोंद का केला म्हणून दिवसाढवळ्या दहशत माजवणाऱ्या इम्या भाई प्रेमी गॅंग वर गोकुळ शिरगाव पोलिसांनी कारवाई करत त्यांना तीन दिवसात अटक करून त्यांच्यावर आज मोक्का लावल्यानेगोकुळ शिरगाव परिसरात पोलिस ठाण्याचे कौतुक होत आहे .
याबाबत गोकूळ शिरगाव पोलिस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2014 ते 2020 या कालावधीत गोकुळ शिरगाव परिसरात गुंडागर्दी करत दहशत माजवणाऱ्या अक्षय रामचंद्र पाटील (वय 24) राहणार श्रीराम कॉलनी उजळाईवाडी तालुका करवीर याने गुन्हेगारी सुरुवात करून आपल्या टोळीत इम्रान शकील नायकवडी (वय 22) राहणार नेर्ली तामगाव रोड उजळाईवाडी तालुका करवीर, ओम्या उर्फ ओमकार किशोर इंदुलकर (वय 25) राहणार कनेरी तालुका करवीर ,विनायक मोहन पाटील( वय 24 ) राहणार मसोबा माळवाडी गोकुळ शिरगाव तालुका करवीर यांनी गेल्या सुमारे सात वर्षाच्या कालावधीत गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे यासह कागल पोलिस ठाणे व गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, वेश्याव्यवसाय, हद्दपार असताना हद्दपार आदेशाचा भंग करून हद्दीत वास्तव्य करणे, हत्यारे वापरणे, दहशत निर्माण करणे असे वेगवेगळ्या सदराखाली एकूण 19 गुन्हे गंभीर केले. असून या आरोपींनी टोळी निशी गुन्हे करून त्यांचा टोळीचा प्रमुख अक्षय पाटील यांचे नेतृत्वाखाली टोळीतील सदस्यांना याचा फायदा व्हावा याकरिता इतर सहकाऱ्यांचा मदतीने त्याने गॅंग बनवून त्याचा बरोबर फायदा घेत, आपण गुन्ह्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून. प्रत्येक वेळेला आपल्यामधील एकेक साथीदाराला यामध्ये पुढे करत कायद्याच्या कचाट्यात येऊ नये याकरता दर वेळी साथीदार बदलून संघटित गुन्हेगारी कृत्यांना कधी प्रत्यक्ष सहभागी होऊन तर कधी पडद्यामागे सूत्रसंचालन करून टोळीतील सहकाऱ्यांच्या माध्यमातून हिंसाचारास सुरुवात केली.
सध्या सगळीकडे कोरण्याचे वातावरण असल्याने सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्तासाठी व्यस्त आहेत. पण या ईम्याभाई गॅंगवर त्याचा कोणताही परिणाम नसून उजळाईवाडी या ठिकाणी चार दिवसापूर्वी येथे दहशत माजवून वाद घातला. शिवाय दोनच दिवसांनी आपल्या विरोधात तक्रार का केली म्हणून स्कार्पिओ गाडी, रिक्षा त्याचबरोबर घरावर दगडफेक असे प्रकार केल्याने गोकुळ पोलिसांनी या चौघांचा चांगलाच समाचार घेत त्यांना उजळाईवाडी दळवी कॉलनी येथे त्यांची दोरी बांधून धिंड काढण्यात आली. या टोळीने बऱ्याच कारवाया केल्या असून बरीच दहशत या भागात निर्माण करण्याच्या हेतूने लोकांच्या मध्ये दहशत पसरवण्याचे काम केले असून यांच्यावर वेळीच आवर घालण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सायक फौजदार मानसिंग रजपूत, पोलीस हवालदार प्रदीप जाधव, बाजीराव पवार यांच्यासह इतरांनी कारवाई करत आज या चौघांच्या वर मोक्का दाखल केला आहे.