ऑनलाइन टीम / मुंबई :
एअर इंडियानं बुधवारी इराणमधून युरोपात जाणाऱया सर्व विमानाचे मार्ग बदलले आहेत. इराणमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशातच बुधवारी सुलेमानीच्या हल्ल्याचा सूड घेत इराणनं इराकमधील अमेरिकन तळावर मिसाईल हल्ले केले. ही युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता एअर इंडियानं विमान प्रवासाच्या मार्गात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
कंपनीचे प्रवक्ते धनंजय कुमार म्हणाले, प्रवासी आणि कर्मचाऱयांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सध्या इराणमधली परिस्थीती पाहता एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची जी विमानं इराणच्या हद्दीतून उडत होती त्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
मार्गात बदल केल्यामुळे प्रवासाचा कालावधी काही मिनिटांनी लांबण्याची शक्मयता आहे. दिल्लीतून प्रवास 20 मिनिटांनी तर मुंबईतून जाणाऱया विमानांचा प्रवास हा 40 मिनिटे लांबण्याची शक्मयता आहे. मेलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया एअर लाइन्सनेदेखील सध्याची परिस्थिती पहता मार्गात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.