शेतकऱ्यांना नाहक त्रास पोलीसांच्या कारवाईची मागणी
चुये / प्रतिनिधी
इस्पुर्ली तालुका करवीर येथून गेलेला काळमवाडी धरणाचा डावा कालवा परिसरात दारूच्या बाटल्यांचा जागोजागी ढीग पाहायला मिळत आहेत. यावरूनच हा परिसर मद्यपींचा नित्य नियमाचा अड्डा बनलेला आहे त्यामुळे या परिसरातून जाताना शेतकऱ्यांना पायाला काचा लागने तसेच कालवा क्षेत्रातील कचरा व इतर गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी धांगडधिंगा घालणारा या मद्यपींवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
काळमवाडी धरण डावा कालवा येवती इस्पुर्ली परिसरातून गेलेला आहे. या कालव्याच्या बाजूने शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी जो रस्ता ठेवलेला आहे. त्या रस्त्यावरती संध्याकाळी दारू पिनाऱ्यांची वर्दळ नित्यांची ठरलेली आहे. चार चौघाच टोळक या वाटेवर बसुन निवांतपणे मद्यप्राशन करतात व दारुच्या बाटल्या रस्त्यावर तर रस्त्या कडेला टाकून जातात काहीजन नशेच्या आनंदांत त्या बाटल्या रस्त्यावर फोडून आनंद साजरा करतात त्यामुळे या वाटेवरून रात्रीच्या वेळी शेताकडे पाण्यावर व शेती कामावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना पायाला काचा लागल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत तसेच या मार्गावरून मोटरसायकल जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक वेळा या त्रासामुळे गाड्या पंक्चर झालेले आहेत. त्याचा त्रास शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी नाहक सहन करावा लागत आहे.या कालव्याच्या पायवाटेवरून अनेक युवक व्यायामासाठी धावत असतात त्यांना सुद्धा या मद्यपीच्या बाटल्यांचा व काचांचा त्रास सोसावा लागला आहे.
तसेच मद्यपींचा कचरा थेट कालव्यात जाऊन पडत आहे अशाप्रकारे रात्रीच्या वेळी या रंगील्या पार्ट्या करून दुसऱ्यांना त्रास देणारी प्रवृत्ती या परिसरात बोकाळलेली आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी सूचना देऊन सुद्धा मद्यपींनी आपला कालवा बार रेस्टॉरंट अद्याप बंद केलेला नाही. त्यामुळे अशा या मध्यपीवर इस्पुर्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करून हा मद्यपींचा अड्डा बनलेला डावा कालवा परिसर मद्यपींच्या विळख्यातून मुक्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.