ईएसआय योजनेत रत्नागिरी जिल्हय़ाचा समावेश नसल्याबद्दल खासदार तटकरे म्हणाले की, या संदर्भात निवेदने मिळाली आहेत. दोनच दिवसांत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार आहे. याला मान्यता देण्याचे काम भारत सरकारकडून असेल तर राज्य सरकारच्या कामगार आयुक्त व कामगार मंत्र्यांची शिफारस घेऊन रत्नागिरी जिल्हा ईएसआयमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव स्वत: दिल्लीला नेऊन पुढे पाठपुरावा करू, असेही तटकरे यांनी सांगितले.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, माजी सभापती शौकत मुकादम आदी उपस्थित होते.