ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी ईडीने अटक केली. यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजकीय सूडबुद्धीतूनच ईडीची कारवाई सुरू आहे. विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्याशी संबंधितांवर किंवा कुटुंबीयांवर केंद्रीय संस्थांकडून कारवाई करण्यात येत आहे. तसंच राजकीय सूडबुद्धीतूनच ही कारवाई सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. आधी लालच दाखवले, मग ऑफर्स दिल्या. त्यानंतर धमकावलं गेलं. तरीही झुकले नाही म्हटल्यावर कुटुंबीयांना धमकावण्यात येत आहे. यानंतरही आम्ही दुर्लक्ष केलं. जाऊ द्या. आता केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा लावला आहे. ईडी आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेली ही कारवाई सहन करून फक्त २०२४ पर्यंतच. त्यांना काय तपास करायचाय तो करू द्या. मीच त्यांना विचारतोय. कुछ मिला क्या… कुछ मिला क्या? आम्ही हे पाहतोय. हा एक खेळ सुरू आहे, असे राऊत बोलले.