एप्रिल-ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीचा समावेश : कोरोना प्रभावाचा परिणाम
नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) चालू वित्त वर्षाच्या प्रारंभीच्या पाच महिन्याच्या दरम्यान एकूण मिळून 35,445 कोटी रुपयांचे 94.41 लाख भविष्य निर्वाह निधी दावे निकालात काढले असल्याची माहिती आहे.
चालू वित्त वर्षाच्या एप्रिलपासून ऑगस्टच्या कालावधीदरम्यान ईपीएफओने मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 32 टक्के अधिकचे दावे या दरम्यान निकाली काढल्याची माहिती आहे. तसेच वितरीत करण्यात आलेल्या रक्कमेतही जवळपास 13 टक्क्मयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार कोविड19 च्या महामारीच्या कारणामुळे प्रतिबंध लागू करण्यात आल्याने हे दावे अधिकचे दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच महामारीच्या कारणामुळेच वेगाने दावे वितरीत केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
सदरच्या दाव्यादरम्यान ईपीएफओने सदस्यांना एप्रिल ते ऑगस्ट 2020 च्या दरम्यान 35,445 कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली आहे. कोरोनाचे संकट असल्याच्या प्रसंगामुळे कामगारांची हातची कामे गेल्याने काहीना खाण्यापिण्याच्या अडचणी जाणवल्या. सर्वाधिक कामगार ईपीएफओच्या ठेवींकडे वळल्याची नोंद करण्यात आली आहे.
दाव्यासाठी कालावधी
ईपीएफओचे दावे निकालात काढण्यासाठी स्वतःमंजुरी प्रक्रियेमधील दाव्यांसाठी तीन दिवस लागतात. तसेच कायदेशीर पातळीवर मात्र दावा निकाली काढण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागत असल्याची माहिती आहे.