ऑनलाईन टीम / मुंबई :
मार्च महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर आज उठवण्यात आली आहे. तसेच राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास देखील ठाकरे सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही.
महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनलॉक 4 संदर्भातील नियमावली आज जाहीर केली आहे. यानुसार राज्यात आता 30 सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.
तसेच खाजगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.