अर्थसंकल्पात ई-पासपोर्ट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सुरू होईल. तो बायोमेट्रिक पासपोर्ट किंवा ई-पासपोर्ट म्हणूनही ओळखला जाईल. अशाप्रकारे, ई-पासपोर्ट जारी करणाऱया निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल.
बायोमेट्रिक पासपोर्ट हे चिप सक्षम पासपोर्ट असतील. ज्यावर लोक बायोमेट्रिक डेटा टाकतील. हा पासपोर्ट रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनद्वारे डेटा ट्रान्सफर करण्याची परवानगी देणार नाही. यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित असेल. बायोमेट्रिक पासपोर्टची कल्पना 2017 मध्ये सर्वप्रथम मांडण्यात आली होती. आतापर्यंत चाचणीच्या आधारावर 20,000 डिप्लोमॅट्सना बायोमेट्रिक पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध असेल. टाटाची कंपनी टीसीएस ई-पासपोर्ट बनवणार आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ई-पासपोर्ट छापण्याचे आणि जारी करण्याचे पूर्ण अधिकार सरकारला असतील. पासपोर्टमध्ये बोटांचे ठसे आधीच वापरले जातात. फिंगरपिंट देखील बायोमेट्रिक्सचा एक भाग आहे.
ई-पासपोर्टचे फायदे…
भौतिक पासपोर्टपेक्षा ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित असतील.
ई-पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक डेटा साठवण्याची क्षमता असेल.
पासपोर्ट हरवल्यास संबंधिताला मोठी अडचण येणार नाही.
ई-पासपोर्टधारकाचा विमानतळावरील तपासणीचा वेळ वाचेल.
ई-पासपोर्टची बनावटगिरी रोखण्यास मोठी मदत होऊ शकेल.
ई-पासपोर्टमुळे प्रवाशांचे इमिग्रेशन जलद होण्यास मदत होईल.