प्रतिनिधी/ रत्नागिरी
ई-पीक पाहणी ऍपमधील नोंदणीमध्ये रत्नागिरी जिह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिह्यातील 94 हजार 47 पैकी 87 हजार 102 शेतकऱयांनी या ऍपवर नोंदणी केली आहे. केवळ 6 हजार 945 शेतकऱयांनी नोंदणी केली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी ड़ॉ बी.एन. पाटील यांनी दिल़ी
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होत़े यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित होत़े शेतकऱयांच्या मदत आणि पारदर्शकतेसाठी महसूल व कृषी विभागामार्फत ई-पीक पाहणी प्रकल्प मागील 15 ऑगस्टला कार्यान्वीत करण्यात आल़ा जिह्यातील 94 हजार 47 ंपैकी 87 हजार 102 शेतकऱयांनी ऍपवर नोंदणी करुन पीक पाहणीची माहिती अपलोड केली आह़े जिह्यातील 20 लाख डिजीटल मोफत सात-बारा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा 3 लाख 42 हजार शेतकऱयांनी फायदा घेतला आह़े उर्वरीत सात-बाराचे वितरण 15 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे नियोजन आहे.
जिल्हय़ातील 11 रुग्णालयांपैकी 8 ठिकाणी ऑक्सिजन प्लाँट कार्यान्वीत
जिह्यातील 11 रुग्णालयांपैकी 8 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती युनिट्स कार्यान्वीत झाली आहेत. काही युनिट्स पीएम केअर व अन्य ‘जिह्या नियोजन’ मधून 3 कोटी 77 लाख रुपये खर्च करुन उभारल्याची माहिती त्यांनी दिली. मनरेगा योजनेची माहीती गावागावमध्ये पोहोचवण्यासाठी गावागावामध्ये शिबीरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिल़ी यासह या योजनेअंतर्गत फळबागा, कुक्कुटपालन आदीसांठी 100 टक्के अनुदान शासन उपलब्ध करुन देत असल्याचेही ते म्हणाल़े
…