उचगाव सरपंच मालुताई काळे पाच वर्षाचे मानधन न घेता कर्मचाऱ्यांना घडविली सफर
उचगाव /वार्ताहर
गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या, कोविड काळात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देणे गरजेचे आहे. १५ वर्षांपूर्वीच्या फासेपारधी वसाहतीचा कायापालट माजी सरपंच गणेश काळे यांनी केला आहे. उचगावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच मालुताई गणेश काळे यांनी आपले ५ वर्षाचे मानधन न घेता त्यातून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तिरुपती बालाजी दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला. परिसरातून या अनोख्या व आदर्शवत उपक्रमाचे कौतुक होत आहे. रविवारी २० मार्चला कर्मचारी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळावरुन रवाना झाले. अनेकांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रु होते.
उचगाव ग्रामपंचायतीमध्ये ५० च्या वर कर्मचारी असुन त्यांनी महापूर तसेच कोविड साथीच्या खडतर काळात कर्मचाऱ्यांनी विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगली सेवा दिली. याबद्दल त्यांना समाधान मिळावे यापुढेही त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या चांगल्या हेतूने आपले पाच वर्षाचे मानधन सरपंच मालुताई काळे यांनी देवून ही अनोखी सफर घडवून आणली. यावेळी कोल्हापूर विमानतळावर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देणेसाठी सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, रवी काळे, मधुकर चव्हाण, दिपक रेडेकर, दिनकर पोवार, सुरेश चव्हाण, राजू काळे, तानाजी पोवार, मारुती पोवार, मदन चव्हाण, शरद काळे व ग्रामस्थ उपस्थित होते,