उचगाव / वार्ताहर
येथे मराठी साहित्य अकादमी आयोजित अठराव्या मराठी साहित्य संमेलनाची बेळगावसह चंदगड, खानापूर व निपाणी तालुका आणि परिसरातील साहित्य रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आयोजकांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. परिसरात आता सर्वत्रच संमेलनाची चर्चा सुरू आहे.
रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱया या संमेलनाच्या तयारीला वेग आला असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी जाहिरात व जनसंपर्क कार्यक्रम, निधी, स्वागत, मंडप, सजावट व अन्य व्यवस्था, ग्रंथदिंडी, सांस्कृतिक, आरोग्य, माहिती व प्रसारण, भोजन आदी समित्यांची रचना करण्यात आली आहे. सर्व समित्यांचे पदाधिकारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथदिंडीसाठी वारकरी, भजनी मंडळ, लेझीम पथक, झांजपथक, ढोलताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ग्रंथदिंडीत सहभागी होण्यासाठी परिसरातील शाळा व विद्यालये तसेच सर्व युवक मंडळांना कळविण्यात आले आहे.
संमेलनातील साहित्यिक कार्यक्रमांची उंची दरवषी वाढत चालल्याने परिसरात एक आगळेवेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सारा गाव संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागला आहे. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, सेपेटरी एन. ओ. चौगुले, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना करत आहेत.
भव्य शामियाना
बेळगाव जिल्हय़ातील जागृत आणि प्रसिद्ध मळेकरणी देवीच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱया या संमेलनासाठी भव्य शामियानाची उभारणी करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बेळगाव, वेंगुर्ले रोडवरील ऍप्रोच रोडपासून ते संमेलन स्थळापर्यंत स्वागत कमानी उभ्या करून साहित्यप्रेमी मंडळींसाठी संमेलन स्थळाचा मार्ग दखविण्यात येत आहे.
गावातील प्राथमिक मराठी शाळा, मळेकरणी हायस्कूल व स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग या संमेलनामध्ये असतो. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थीवर्गाला कवी, लेखक जवळून पाहता येतात. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. यासाठी दरवषी विद्यार्थीवर्गाला सामावून घेऊन त्यांचे विचार ऐकण्याची संधी दिली जाते. परिणामी गेल्या सतरा वर्षामध्ये मुले-मुली कविता करू लागले आहेत. शाळेत दिलेल्या विषयावर लेख, निबंध लिहिण्यात त्यांना सोपे जात आहे. हे तर या संमेलनाचे फलित आहे असे मनोगत या भागातील अनेक पालक व ग्रामस्थांमधून व्यक्त होताना दिसत आहे.
सर्वांसाठी वनभोजनाचा अस्वाद
संपूर्ण बेळगाव, चंदगड व खानापूर तालुक्मयातील उचगाव येथील मळेकरणीदेवी ही जागृत दैवत आहे. संपूर्ण वर्षभर प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार व शुक्रवार येथे यात्रा भरत असते. यावेळी मांसाहारी जेवणावळी असतात. मात्र वर्षातील हा एकच दिवस संमेलनाच्या दिवशी साहित्य प्रेमीसाठी गोड वनभोजनाचा आस्वाद दिला जातो. यावषीही तो सर्वांसाठी दिला जाणार आहे.
पुस्तक प्रदर्शन
वाचन संस्कृती वाढावी म्हणून संमेलनात येणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी व साहित्यप्रेमी यांनी एक तरी पुस्तक खरेदी करावे या उद्देशाने अकादमी गेली सतरा वर्षे सातत्याने पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. यावषीही प्रकाशकांना निमंत्रण देण्यात आले आहे.