मध्यवर्ती म. ए. समितीची महाराष्ट्र सरकारकडे मागणी : 17 रोजी हुतात्म्यांना अभिवादन
प्रतिनिधी /बेळगाव
न्याय हक्कासाठी लढणाऱया मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेबद्दल निषेध व्यक्त करणाऱयांवर राजदोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्तीच्या अध्यक्षांवर शाईफेक करण्यात आली. या घटनांमुळे बेळगावच्या नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुंबई अथवा शक्मय असल्यास कोल्हापूर येथे उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, असा ठराव मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. काही उपद्व्यापी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर केलेल्या शाईफेकीचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच त्यानंतर संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांनी बंद पाळून समितीला जी ताकद दिली त्याबद्दल मराठी भाषिकांचे आभार मानण्यात आले. दि. 17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार असून सीमावासियांनी हा दिवस गांभीर्याने पाळावा, असे आवाहनही करण्यात
आले.
हिंमत असेल तर बंदी घाला
समितीवर बंदी घालण्याची वल्गना कन्नड संघटनांसह नेतेमंडळींनी केली आहे. विधानभवनात यावर चर्चाही करण्यात आली. हिंमत असेल तर कर्नाटक विधिमंडळाने महाजन अहवाल संमत करावा व समितीवर बंदी घालावी. असे घडल्यास हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयात एक भक्कम पुरावा म्हणून वापरता येईल, असा इशारा खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिला.
अटक झालेल्या तरुणांना सर्वतोपरी सहकार्य
देशाचे मानबिंदू असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाल्यानंतर निषेध व्यक्त करणाऱया मराठी भाषिक तरुणांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले. अटक झालेल्या तरुणांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. वकिलांशी नेहमी संपर्कात असून त्यांना जामीन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे तरुण अटकेत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना परिसरातील नागरिकांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, निपाणी विभाग समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, जगन्नाथ बिर्जे यांच्यासह इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परप्रांतीय म्हणणार का?
बेंगळूर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान झाला. त्या मूर्तीची स्थापना 9 फेबुवारी 1994 रोजी करण्यात आली होती. यावेळी वाटाळ नागराज या उपद्व्यापी संघटनेच्या पदाधिकाऱयाने विरोध केला होता. परप्रांतियांचे बेंगळूरमध्ये पुतळे उभारून त्यांना मोठे करू नये, असे उद्गार त्याने काढले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रात घडले. मग त्यांना परप्रांतिय म्हणण्याची हिंमत तुमच्यात आहे का? असा खोचक प्रश्न माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी उपस्थित केला.