वार्ताहर / मोडनिंब
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आणि सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱया उजनी धरण ते सोलापूर यशवंत सागर जलवाहिनीला अरण (ता. माढा) येथील स्मशानभूमीलगत असलेल्या एअर व्हॉल्वला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीला ठिकठिकाणी एअर व्हॉल्व आहेत. गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी व्हॉल्व्हचे नटबोल्ट काढून निकामी केले. मध्यरात्रीपासून शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. गळतीच्या पाण्याचा दाब मोठा होता. त्यामुळे सुमारे साठ ते सत्तर फुट पाण्याचे फवारे उडाले. पाणी ओढय़ाने वाहत पुढील काही बंधा-यामध्ये साचले आहे.
सध्या पाण्याची टंचाई सुरू झाली असून पाण्याचा व्यर्थ वापर टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत परंतु अशा झालेल्या गळतीमुळे सोलापूरकरांच्या पाणी टंचाईमध्ये आणखी भर पडली आहे. या घटनेची माहिती पालिका कर्मचाऱयांना मिळताच सकाळी साडे दहाच्या सुमारास उजनीतील मोटारी बंद करून व्हॉल्व दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
पाणीमिळवण्याचीनामीशक्कल
उन्हाळ्याच्यादिवसातपाण्याचीटंचाईनिर्माणझालीकीराष्ट्रीयमहामार्गालगतकाहीठिकाणीनेहमीचव्हॉल्वमधूनपाणीगळतीहोण्याच्याघटनाघडतात. यावरूनव्हॉल्वफुटतोकाफोडलाजातोयावरप्रश्नचिन्हआहे. मध्यरात्रीसुरूझालेलीगळतीदुसऱयादिवशीउशिरापर्यंतथांबवण्यातपालिकेच्याकर्मचाऱयांनावेळलागतो. तेवढय़ाकाळातलाखोलिटरपाण्यातूनओढेआणिबंधारेभरलेजातात, हीएकनामीशक्कलअसल्याचीचर्चाआहे.