बेळगाव :/ प्रतिनिधी
जुन्या तहसीलदार कार्यालयातील उतारा केंद्र तब्बल आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना उताऱयाविना माघारी परतावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत उतारे मिळावेत, यासाठी बेळगाव तहसीलदार कार्यालयासह शहराच्या इतर ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू आहेत. मात्र खिडचीच बंद असल्याने नागरिकांना उताऱयाविना माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
पीक कर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बी-बियाणे, खते वाटप, जमीन खरेदी-विक्री, शासनाच्या शेतीसंबंधी योजना आदी कारणांसाठी शेतकऱयांना सातबारा महत्त्वाचा असतो. मात्र सातबारा मिळणारे जनस्नेही केंद्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांना उतारा मिळविण्यासाठी इतरत्र असलेल्या जनस्नेही केंद्रांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे इतरत्र असलेल्या केंद्रांवर गर्दी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सोयाबिन व बटाटे बियाणे कुजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी सातबारा गरजेचा आहे. मात्र जनस्नेही केंदांतून वेळेत उतारे मिळत नसल्यामुळे शेतकऱयांना नुकसान भरपाईपासून दूर राहावे लागणार आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयातील जनस्नेही केंद्राच्या खिडकीवर तांत्रिक अडचणीमुळे केंद्र बंद ठेवल्याची सूचना लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उताऱयासाठी फेऱया माराव्या लागत आहेत. शेतकऱयांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने जनस्नेही केंद्रे सुरळीत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.