कौंदल येथे खानापुरातील ज्येष्ठ नागरिक संघटेनेच्या वन मंचचे उद्घाटन : ज्येष्ठय़ानी दोनशे झाडे लावून उपक्रम घेतला हाती
खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुका हा निसर्ग संपत्तीने नटलेला तालुका आहे. तालुक्मयाच्या जंगल प्रदेशात अनेक वनौषधी झाडांची लागवड उत्तमप्रकारे होते. पण भर लोकवस्तीच्या भागामध्ये या वनऔषधी झाडांची लागवड करून वनसंपदा जतन करणे विशेष करून पर्यावरणाचा समतोल यासाठी प्रत्येक आणि झाडे लावून ती जगवणे यासाठी प्रयत्न करावा, पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्राणवायूची किती आवश्यकता आहे. याची जाणीव प्रत्येकाला आता झाली आहे. यासाठी सदृढ आयुष्यासाठी उत्तम आरोग्य जोपासण्यासाठी वनौषधी झाडांची लागवड करून त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन कर्नाटक राज्य ज्येष्ट नागरिक संघटनेचे अध्यक्ष ए. वाय. भेंडीगिरी याने व्यक्त केले. खानापूर तालुका जे÷ नागरिक संघटनेच्यावतीने सोमवारी तालुक्मयातील कुंडल येथील माऊली मंदिराच्या परिसरात असलेल्या दोन एकर जागेत खानापूर तालुका जे÷ नागरिकांच्या उपस्थितीत वनमहोत्सव तसेच जेष्ट नागरिक व मंचचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ट नागरिक संघटनेचे सदस्य व जेष्ट नागरिक देवाप्पा भोसले होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना तालुका जेष्ट नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोसी याने करून झाडे लावा झाडे जगवा व आरोग्य जपा, यासंदर्भात माहिती दिली व आरोग्याला पोषक अशा झाडांचा काय लाभ होतो, झाडांच्या लागवडीमुळे आयुर्वेदाला किती महत्त्व आहे. यासंदर्भात त्यांनी विचार मांडून या मंच स्थापन मागचा उद्देश त्यांनी मांडला. सहशिक्षक व जेष्ट नागरिक टी. वाय. पाटील यांनीही या जेष्ट नागरिक मंचाच्या कार्याबद्दल आढावा मांडला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात जेष्ट नागरिक वन नामफलकाचे अनावरण सामाजिक वन खात्याचे विभागीय अधिकारी व्ही. एस. धुमगोळ यांने तर माऊली देवीचे पूजन वनखात्याच्या तालुका विभागीय अधिकारी सौ. कविता तरनट्टी यच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व ज्ये÷ नागरिकांच्या हस्ते विविध वनौषधी व फळे देणारी जवळपास दोनशे झाडे उपस्थितांच्या हस्ते लावण्यात आली. त्यानंतर गावातील समुदाय भवनात झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय ज्येष्ट नागरिक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. मुदकवी यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन झाले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी निमंत्रित पाहुण्यांचा श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना राज्य ज्येष्ट नागरिक संघटनेचे कोषाध्यक्ष बापट म्हणाले, खानापूर तालुका जेष्ट नागरीक संघटनेने हा उपक्रम घेऊन ज्येष्टचा मान उंचावला आहे. शिवाय या संघटनेतील एकता व ज्येष्टनी घेतलेला सहभाग हा संपूर्ण कर्नाटकातच एक अभिनंदनाचा भाग असून वन महोत्सवाच्या माध्यमातून वनौषधी झाडांचा उपयोग भावी युवा पिढीला प्रेरणादायी ठरावीत, युवकांनी देखील त्याने केलेल्या आदर्शाचे पालन तंतोतंत करून भविष्यामध्ये पर्यावरण जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, केवळ झाडे लावून चालला नाही ती जगवण्यासाठीही प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमात बोलताना डी. एम. भोसले म्हणाले खानापूर तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात जंगल संपत्ती आहे. या जंगलात प्रत्येक विभागात असलेल्या प्रत्येक ज्येष्ठानी अशा वनौषधी झाडांची लागवड करण्यासाठी सर्वांना प्रेरित करावे, कौंदल गावाला हा ज्येष्ट नागरिक संघटनेने दिलेला पहिला मान आम्ही जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांच्या सहकार्यातून या व मंचचे जोपासना करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावरून खानापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जा. बेनकट्टी, निवृत्त शिक्षिका एलेन बोर्जीस, संघटनेचे सेपेटरी सी. एस. पवार ज्येष्ट नागरिक पांडुरंग डिचोलकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमात सूत्रसंचालन व जेष्ट नागरिक वन मंच स्थापने मागचा आढावा संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केल. तर आभार सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला खानापूर को, ऑप. बँकेचे संचालक मारुती पाटील, ग्राम पंचायतचे अध्यक्ष लक्ष्मी प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष नारायण देवा पाटील, सदस्य उदय नारायण भोसले, सदस्य शुभांगी सातेरी गाडी यासह तालुक्मयाच्या विविध कानाकोपऱयातून अनेक सेवानिवृत्त शिक्षक, जेष्ट नागरिक व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.