लखनौ
कोरोना महामारीच्या वाढत्या संक्रमणादरम्यान उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मोठी कामगिरी केली आहे. उत्तरप्रदेश सरकारने राज्यात 175 हर्बल रस्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या हवेत प्रतिकारक क्षमता निर्माण होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत पिंपळ, कडुलिंब, तुळस, गिलोय, अश्वगंध, मेंथा, निंबू, भृंगराज, आवळा, ब्राह्मी, अनंतमूळ, द्वारपाल, हळद आणि अन्य आयुर्वेदिक आणि हर्बल रोपांच्या 30 प्रजातींची 38,000 हून रस्त्यांच्याकडेला लागवड करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशला हिरवेगार करणे आणि हवा शुद्ध करण्यासाठी योगी सरकारने राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला हर्बल रोपे लावली आहेत.