ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड राज्यात आता मास्क न वापरल्यास 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. या संदर्भात शनिवारी निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी महामारी कायदा 1897 उत्तराखंड राज्य दुरुस्ती अध्यादेशास आज मंजुरी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आता जर कोणी मास्क घातला नाही किंवा सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास सहा महिन्याची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, उत्तराखंड केंद्र हे हा कायदा मंजूर करणारे तिसरे राज्य बनले आहे. याआधी केरळ आणि ओडिशा राज्यांनी या कायद्यास मंजुरी दिली आहे.