बीड/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरण चांगलेच गाजत असताना सोमवारी दहशतवादी पथकाने आणखी तिघांना अटक केली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान खान असं आरोपीचे नाव असून तो बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा या गावचा रहिवासी आहे. मूकबधिर विध्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा हा सगळा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आले आहे.
सोमवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी मन्नू यादव उर्फ अब्दुल, इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली आहे. यामधील इरफान शेख हा महाराष्ट्राच्या बीडमधील आहे. यामुळे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचले आहेत. अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस सध्या उपर गौतम याने आपल्या आयडीसी संस्थेमार्फत केलेल्या धर्मांतराची माहिती घेत असल्याचं म्हटलं आहे.