ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात 31 जुलैपर्यंत फक्त दर वीकेंडला लॉक डाऊन सुरू राहणार अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली होती. त्यानुसार काल रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉक डाऊन सुरू झाले आहे. तरी देखील आज म्हणजेच शनिवारी सकाळी मुरादाबाद मधील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसली. लोकांकडून सकाळपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जात आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी सांगितले होते की, उत्तर प्रदेशात 16 ते 30 जुलै या कालावधीत संपूर्ण लॉक डाऊन नसेल मात्र, प्रत्येक आठवड्याच्या दर शनिवार आणि रविवारी कडक लॉक डाऊन असेल. तसेच या काळात सर्व बाजार, मॉल आणि कार्यालये देखील बंद राहतील. मात्र, या काळात आरोग्य आणि चिकित्सा सेवा, आवश्यक सेवा पहिल्या प्रमाणेच सुरू राहणार आहेत.
असे कडक निर्बंध असून देखील उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील भाजी मार्केटमध्ये पहिल्याच शनिवारी लोकांकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झालेले दिसत आहे.