ऑनलाईन टीम / शहाजहांपुर :
उत्तर प्रदेशातील शहाजहांपुरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहाजहांपुर शहरातील वाजिद खेल मोहल्ल्यात घडली. इथे भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. भिंत कशामुळे पडली याबाबत अजून माहिती मिळाली नाही.
ज्यावेळी भिंत कोसळली त्यावेळी कुटुंबातील लोकं झोपलेली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.