ऑनलाईन टीम/तरुण भारत
हिवाळ्याच्या हंगामात पाऊस पडल्याने थंडी पडण्यास उशिर झाला. मात्र गेल्या काही दिवसात तापमनात घट होत असल्याचं दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडी जाणवू लागली आहे. उत्तर भारतात तर पारा घसरला आहे. उत्तर भारतातील राज्यांच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे कारण या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. १८ डिसेंबरपासून चंदीगड आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आयएमडीने दिली आहे.