ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता रेल्वे सेवा हळूहळू पूर्व पदावर येत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज मोठी घोषणा केली आहे.
ते म्हणाले, ही वेळ भारतातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याची आहे. त्यामुळे लवकरच आम्ही अजून ट्रेन सुरू करू. आज आम्ही भारतीय रेल्वेचे तिकीट ऑफलाईन बुकिंग सुरू करत आहोत. ही सेवा 22 मे म्हणजेच उद्या पासून जवळपास 1.7 लाख कॉमन सर्विस केंद्रावर सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुढे ते म्हणाले, पुढील दोन तीन दिवसांमध्ये स्टेशनवरील तिकीट काउंटरवर तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सध्या प्रवाशांना काउंटरवर तिकीट मिळत नाही आहे. पण याचा अभ्यास करत असून याबाबत मार्गदर्शक प्रणाली बनवण्याचे काम चालू आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, आज पासून ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर पहिल्या 73 विशेष ट्रेन साठी अवघ्या दोन तासात 1 लाख 49 हजार 25 तिकीटे बुक झाली आहेत.